Posts

अंतर्मन खुणावत आहे

Image
अंतर्मन खुणावत आहे.      एक दिवस असाच मनामध्ये असंख्य प्रश्नांचे काहूर घेऊन बाहेर पडलो. दुचाकीवर स्वार होऊन वाट दिसेल त्या दिशेने निघालो, वळणे वळणे घेत आणि ओबडधोबड रस्त्यावर चालून शांत , निर्जन, एकाकी आणि प्राचीन आशा शिवमंदिराजवळ येऊन थांबलो. मनाला शांती मिळेल आणि प्रश्नांची उत्तरे ही मिळतील म्हणून मंदिरात जाऊ म्हटलं.         प्राचीन पण मोडकळीस आलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. समोर गाभाऱ्यात नुकतीच कोणीतरी पूजा करून गेलं असावं, कारणं हवेत अजूनही त्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि शिवलिंगावर वाहिलेली पांढरी फुलं अजून टवटवीत होती. गाभाऱ्यातील दिवा मंदपणे तेवत होता. गाभाऱ्यात जायची इच्छा नव्हती म्हणून सभामंडपात एका खांबाला टेकून बसलो. मंदिरातील गारवा मनाला शांती देत नव्हता मनातील प्रश्न अजूनही तसेच होते. असे का.?? माझ्यासोबतच का..?? माझं काय चुकलं..?? का मलाच नेहमी अपयश..? का माझ्यासोबतच अडथळ्यांची शर्यत..?? 'रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा' असा मी म्हणतोय खरं पण खरंच माझा रंग वेगळा आहे का..?? की मी ही केवळ सामान्य आहे..?? कुसुमाग्रज

वसंतगड :- पौर्णिमा आणि तीन भटके.

Image
वसंतगड भटकंती पौर्णिमेच्या रात्री.      किर्रर्रर्र अंधारी रात्र तीन भटके शिवकाळ अनुभवावा या इच्छेने गडावर भटकत होते, सोबत ना बॅटरी ना मोबाईल फक्त साक्षीला तो चंद्र आणि त्याचा प्रकाश . त्यातील एक गडकोटांबद्दल बोलतोय, एक इतिहासातील गोष्टी सांगतोय तर एक इतिहासातील कल्पनांमध्ये गुंग. इतका मोठा गड त्याचा पसाराही तितकाच असणार ना..? मग वेळ तर लागणारच की.. तर गोष्ट अशी,          महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या 'टीम वसंतगड' तर्फे 'वसंतगड किल्ल्यावर' मशाल मोहोत्सव घेण्यात आला , गडावर जणू शिवकाळ अवतरला मशाली घेऊन सर्व गड फिरून झालं आणि मशाल मोहोत्सव संपला. रात्रीचे 2 वाजले असावेत सगळे झोपी गेले पण 3 जण जागे होते ज्यांना दंगामस्ती करून झोप येत नव्हती. तिघांचं नियोजन ठरलं  आज पौर्णिमा. रात्रीचा गड फिरायचा..!! शिवशाहीत मावळे जसे रात्रीचे फिरत तसे गडाच्या तटाबुरुजावरून फिरून मनसोक्त  गड फिरू. तोही विना बॅटरी आणि मोबाईल घेता, चंद्र आहे सोबतीला तो दाखवेल तेव्हढं पाहायचं आणि येऊन झोपायचं ठरलं..          तिघेही उठले आणि सुरुवात कुठून करायची तर एकजण म्हणाला, "गोमुखी

मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.

Image
★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★ मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी) वेळ दुपारी ४ वाजता.. ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.)          आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄)       तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली. कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो.                डोंगर चढून उतरल्याने आणि पोट भरून जेवल्याने आम्हाला हळूहळू सुस्ती यायला लागली पा

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!

Image
                   सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.       समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव स

विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली

Image
..विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली..      इतिहासात मराठ्यांची राजधानी असणारी ऐतिहासिक सातारा नागरी आणि सातारा जिल्हा संपुर्ण जिल्ह्यात मराठा इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे. अशाच मराठा इतिहासाच्या खुणा असणारे एक ठिकाण सातारा पासून चार किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर असल्यामुळे या गावाचे दोन भाग आहेत अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाध्या नदीच्या काठी आहेत. याशिवाय प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात येथे एकूण दहा मंदिरे बांधली असून ती सर्व नदीच्या काठावर आहेत. आज विश्वेश्वर मंदिराबद्दल बोलू बाकी मंदिराबद्दल परत कधीतरी लिहिनच. ..विश्वेश्वर मंदिर..         विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थानावर आहे. सातारा गेझेटिअर नुसार हे मंदिर १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे . नदीच्या बाजूने प्रवेश आलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत.  तारकाकृती असणाऱ्या या मंद

खंडेराया स्तोत्र

                 मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।। कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ  चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।    त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।। ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म । त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।। जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।। मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

!!. सौदामिनी .!!

!!.  सौदामिनी .!! आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी; सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१ राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी, कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२ सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी, चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३ शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी, काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४ सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर, वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५ - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे. तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे !  तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे !  त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत !  पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !! "राजवंदना" - बाबासाहेब पुरंदरे